पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दहावी व बारावी बोर्डच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका! परीक्षाविना अन्य मार्ग काढण्याची विद्यार्थ्यांसह पालकांनी केली मागणी

इमेज
दहावी व बारावी बोर्डच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका! परीक्षाविना अन्य मार्ग काढण्याची विद्यार्थ्यांसह पालकांनी केली मागणी बीड दि.३१ (प्रतिनिधी) - दहावी व बारावी बोर्डच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये. नाहीतर विद्यार्थ्यांचे करिअर व उज्ज्वल भविष्याची शाश्वती द्यावी किंवा परीक्षेविना अन्य मार्ग काढावा अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, १)यावर्षी दहावी व बारावी मध्ये असलेले विद्यार्थी कोरोना महामारी च्या लॉक डाऊनमुळे गेल्यावर्षी नववी व अकरावी वीच्या परीक्षा न देता शासन निर्णयानुसार दहावी आणि बारावीच्या वर्गात दाखल केलेले आहेत. यामुळे त्यांची गुणवत्ता शाळा व शिक्षकांसह त्यांना स्वतःलाही न्याहाळता आलेली नाही. २) परीक्षेविना पुढच्या वर्गात पाठविलेल्या या विद्यार्थ्यांना पुन्हा थातूरमातुर शिक्षणाच्या भरवशावर दहावी व बारावी बोर्ड सारखी महत्त्वाची परीक्षा देण्यास लावणे कितपत योग्य आहे ? ३) २२ मार्च ...

महाराष्ट्रात उद्यापासून ‘नाईट कर्फ्यू’, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्रात उद्यापासून ‘नाईट कर्फ्यू’, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई दि.२१ (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यात उद्यापासून (२२ डिसेंबर) महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ५ जानेवारीपर्यंत हे नियम लागू राहतील. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार चांगलेच सतर्क झाल्याची माहिती मिळत आहे.    ब्रिटनसह जगातील अन्य ६ देशांमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर, संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन तर इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   ब्रिटनमध्ये आढळून...

बीड शहरातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट*

इमेज
* बीड शहरातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट* *बिंदुसरा पुलाचे चौपदरीकरण आणि शहरातून जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची केली मागणी* खा.प्रितमताईंच्या मागणीला नितीन गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद बीड.१६(प्रतिनिधी):-बीड शहरातून जाणाऱ्या अहमदनगर-बीड-परळी महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.शहरातून जाणाऱ्या प्रमुख महामार्गाची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी त्यांनी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा देखील केली आहे. बिंदुसरा नदीवरील पुलाचे चौपदरीकरण आणि शहरातून जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे. भौगोलिक तसेच धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने बीड शहर हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी तसेच अंबाजोगाईसह लिंगायत धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेले मन्मथ स्वामी यांच्या कपि...

सुप्रिया सुळेंना राज्यात रस नाही; सुप्रियांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान

इमेज
सुप्रिया सुळेंना राज्यात रस नाही; सुप्रियांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना केंद्राच्या राजकारणात रस आहे, असं सांगत सुप्रिया यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे.  भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. पण पवारांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रियांना देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करायला आवडतं. प्रत्येकाचा एक इंट्रेस्ट असतो. सुप्रियांचा इंट्रेस्ट तिकडे आहे, असं पवारांनी सांगितलं.  काय म्हणाले होते आशिष शेलार? ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे...

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात 62.08 मतदान

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात 62.08 मतदान उत्साहात व शांततेत मतदान संपन्न बीड दि. १, (प्रतिनिधी)  महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 साठी आज सकाळी 8 वाजता मतदान उत्साहात व शांततेत सुरुवात झाली, सायंकाळी 5 पर्यत मतदान बजावण्यासाठी नागरीकानी मोठ्या प्रमाणात रांगा लावण्यात आल्याचे दिसून आले होते. जिल्ह्यातील 131 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची  आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे अंतिम टक्केवारी 62.08 झाली होती. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात उत्साहात मतदान  झाले.  परळी , गेवराई ,  माजलगाव,  बीड,  आष्टी, केज, अंबाजोगाई,  वडवणी, धारुर,  शिरुर कासार, पाटोदा  या प्रमुख  शहरासह जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.         जिल्ह्यामध्ये पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी पुरुष 50310, महिला 13126 अशी एकूण 63 हजार 126  इतकी मतदारसंख्या आहे.  सायंकाळी 5 वाजेपर्यत प्राप्त झालेल्या अंदाजानुसार एकूण 39 हज...

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

इमेज
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश रश्मी ठाकरेंच्या हस्ते बांधुन घेतले  शिवबंधन.. लक्षवेधी भगवा मास्क! मुंबई दि. १(प्रतिनिधी): राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला. पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं आहे.   विधान परिषदेत शिवसेनेचा आवाज उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने अधिक बुलंद होणार आहे. अभिनेत्री कंगना रनौतने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल चढवला असताना उर्मिला यांनी ठाम भूमिका घेत कंगना सुनावलं होतं. त्यानंतर काही महिन्यातच उर्मिला मातोंडकर यांना खुद्द उद्धव ...