पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनोजवं मारुततुल्यवेगं*

इमेज
// * मनोजवं मारुततुल्यवेगं* // --------------------------------- ----   *ब्रह्मचर्य, मांगल्य, बल आणि पवित्रता, यांची आदर्श मुर्ती म्हणजे हनुमान. आत्म्याची, ईश्वराची, रामाची प्राप्ती निर्बल करु शकत नाही,  त्याच्या प्राप्तीसाठी शरीरबल, मनोबल, बुद्धीबल यांची गरज असते. हे हनुमंताने स्वत:च्या जीवनाव्दारे दाखवुन दिले. रामदासांनी गावोगावी आखाडे व व्यायामशाळा स्थापन केल्या, परंतु शक्तीने माणुस पशु किंवा  राक्षस बनतो, ही गोष्ट ध्यानात घेऊन प्रत्येक गावात मारुती ची मंदिरे स्थापन केली. भक्तिमुक्त शक्ति माणसाला राक्षस बनवते तर भक्तियुक्त शक्ति माणसाला देवत्व प्राप्त करते.*  --------------------------------------      जगात सात चिरंजीवांपैकी ज्याची गणना आहे, अशा हनुमंतरायाचा चैत्र शुध्द पौर्णिमेला जन्म  झाला. शंकराचे नंदीशिवाय मंदिर असु शकत नाही, तसे श्रीरामाचे देवालय हनुमंताच्या मुर्ती शिवाय असु शकत नाहीत.  भक्ताशिवाय भगवान अपुरा या भावनेचे दर्शन यावरून होते.     विवेकी, विनयी, वाक्चतुर, जितेंद्रीय, स्थिरबुध्दी, समयसूचकता, कर्तव...

आदर्श व विनम्रतेचे प्रतिक प्रा. शिवाजीराव (दादा) रानमारे

इमेज
आदर्श व विनम्रतेचे प्रतिक प्रा. शिवाजीराव (दादा) रानमारे      सरस्वती भवन वरिष्ठ महाविद्यालय औरंगाबादचे प्रा. शिवाजीराव सदाशिवराव रानमारे म्हणजेच आम्हा सर्वांचे दादा यांनी जगाचा निरोप घेतला,ही वार्ता ऐकून मन अगदी सुन्न झाले. ते धनगर जवळका गावचे एक आदर्श सुपुत्र होते. त्यांच्या निधनाच्या वार्तेने संपूर्ण गाव व त्यांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्ती हळहळला. दादांमध्ये विनम्रता व आदर्श हे गुण तर होतेच त्याच बरोबर प्रत्येका विषयी तळमळ त्यांच्या मनात सदैव असायची. आम्ही लहान असताना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते. त्यावेळेस आमचे आई-वडील व गावातील मोठी माणसे आम्हाला दादां सारखे शिकावे  व वागावे असे सांगायचे. त्यावेळेस दादा वयाने तरुण होते पण अगदी वयोवृद्ध माणसे सुद्धा त्यांचा आदर करायचे. कारण दादा ही प्रत्येकाचा आदर करत होते. गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला ते अभ्यासाविषयी खुप तन्मयतेने मार्गदर्शन करत असे. सुरुवातीला त्यांनी प्रियदर्शनी विद्यालय पाटोदा येथे शिक्षकाची नोकरी केली होती.पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालय पाटोदा येथे काही वर्षे ते प्राचार्य प...

राज्यात लॉकडाऊनची शक्यता उद्या होणार सर्वपक्षीय बैठक

इमेज
राज्यात लॉकडाऊनची शक्यता  उद्या होणार सर्वपक्षीय बैठक मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी): गेले आठवडाभर लादलेले कडक निर्बंध आणि वीकेंड लॉकडाऊननंतर कोरोना आटोक्यात न आल्यास राज्यात किमान तीन आठवड्याचा संपूर्ण लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.    राज्यात कडक निर्बंध लादूनही  परिस्थिती बदलल्याचे चित्र नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनां बाबत उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे सरकार आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचे मत घेतले जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध...