पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न

इमेज
बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा   बीड / प्रतिनिधी महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ना. मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या.  संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत कामगार चळवळीतील प्रत्येकाच्या योगदानाचेही यावेळी संस्मरण केले.           कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी  सकाळी ठीक ८.०० वा. ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित कुंभार, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार यांसह महत्वाचे अधिकारी व ...

बीडचे तीन पोलीस कर्मचारी महासंचालक पदकाचे मानकरी

इमेज
बीडचे तीन पोलीस कर्मचारी महासंचालक पदकाचे मानकरी  बीड  : पोलीस दलामध्ये 15 वर्षे निष्ठापूर्वक आणि तत्पर सेवा बजावल्याबद्दल पोलीस महासंचालकांतर्फे पदक देऊन कर्मचार्‍यांना गौरव केला जातो. यंदा जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचारी महासंचालकांच्या पदकाचे मानकरी ठरले आहेत. पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि.30) राज्यातील 8090 कर्मचार्‍यांना पदके जाहीर केली. यामध्ये बीड जिल्हा पोलीस दलातील तीन कर्मचार्‍यांचा समावेश आहे.    महामार्ग विभागातील पोलीस नाईक गणेश दुधाळ, स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार मोहन क्षीरसागर, पोलीस नाईक नरेंद्र बांगर हे महासंचालक पदकाचे मानकरी ठरले आहेत. पोलीस दलात 15 वर्षे उल्लेखनीय कामगिरी करुन आव्हानात्मक गुन्ह्यांच्या तपासात मोलाचे योगदान देणार्‍या कर्मचार्‍यांचा महासंचालक पदके प्रदान करुन लवकरच गौरव होणार आहे. या यशाबद्दल पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांनी तिन्ही कर्मचार्‍यांचे स्वागत केले आहे.

औरंगाबादमध्ये एचडीएफसी बँकेच्या टीव्ही सेंटर शाखेला आग!

इमेज
औरंगाबादमध्ये एचडीएफसी बँकेच्या टीव्ही सेंटर शाखेला आग! औरंगाबादमध्ये एचडीएफसी बँकेच्या टीव्ही सेंटर शाखेला आग! औरंगाबाद : एचडीएफसी बँक टीव्ही सेंटर शाखेला गुरुवारी (दि.३०) सकाळी आग लागल्याची घटना घडली. दरम्यान अग्निशमन विभागाच्या सहकार्याने आग विझवण्यात आली. सकाळी ११ च्या दरम्यान बँकेला आग लागल्याची घटना घडली. जवळपासचे नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांना आग विझवणे शक्य नसल्याने अग्निशमन विभागाच्या कार्यालयाला घटनेची माहिती दिली. काही वेळात अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. आगीमुळे बँकेतील जास्त नुकसान झाले नाही अशी माहिती बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारगावकर यांनी दिली.

प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासामंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार ,जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार

इमेज
  प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार मुंबई दि ३०: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व व जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे दूरध्वनी क्रमांक असून controlroom@maharashtra.gov.in हा ईमेल देण्यात आला आहे. जिल्ह्यांचे नोडल अधिकारी  त्यांच्या जिल्ह्यातील अडकल...

सपोनि.सचिन पुंडगेला तीन दिवसाची कोठडी

इमेज
सपोनि.सचिन पुंडगेला तीन दिवसाची कोठडी बीडः गुन्हेगारीला आला घालण्यासाठी गुन्हेगारांना कडक शासन करायचे. कोठडीत ठेवायचे.. पण पैशाच्या मोहामुळे स्वतः कोठडीत थांबण्याची वेळ आली. वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी व पकडलेल्या टिप्परला पुढे सहकार्य करण्यासाठी नेकनूरचे ठाणेदार सपोनि.सचिन पुंडगे, पोहेकॉ.माणिक तांदळे यांना पंधरा हजारांची लाच घेतांना बुधवारी रंगेहाथ पकडले. गुरुवारी (दि.30) दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची (दि.3 मे पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.      नेकनूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे व पोहेकॉ.माणिक तांदळे हे वाळूचे ट्रॅक्टर सोडवण्यासाठी पंधरा हजारांची लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे प्राप्त झाली होती. बुधवारी सायंकाळच्या सुमारास सापळा रचत दोघांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची (दि.3 मे पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्वगृही परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सूचना जारी

इमेज
स्वगृही परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सूचना जारी बीड : लॉकडाउनमध्ये विविध राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय विद्यार्थी, मजूर, भाविकांसह अन्य लोकांचा घरी जाण्याचा मार्ग केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी मोकळा केला आहे. राज्यांनी मार्गदर्शक तत्वे निश्चित करुनच अशा लोकांना घराकडे पाठवावे असे आदेशित केले होते. त्यानुसार राज्य शासनाने 13 कलमी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. याची अंमजबजावणीचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. आदेशात म्हटल्याप्रमाणे, गृहमंत्रालयाने जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून निर्देश देण्यात येत आहेत. त्यानुसार लॉकडाउनमध्ये विविध राज्यात अडकून पडलेल्या व्यक्तींना स्वगृही पाठविण्यासाठी अथवा राज्यात आणण्यासाठी राज्यस्तरावर अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती एडजेस कुंदन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे राज्य संचालक अभय यावलकर हे नियंत्रक म्हणून काम पाहतील. त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील. जिल्ह्यांचे नोड...

बीड जिल्हा रुग्णालय परिसरात आढळली आठफुट लांब धामिनसर्पमित्रांनी कुशलतेने पकडली

इमेज
बीड जिल्हा रुग्णालय परिसरात आढळली आठफुट लांब धामिन सर्पमित्रांनी कुशलतेने पकडली  बीड (प्रतिनिधी): येथील जिल्हा रुग्णालयात तब्बल आठ फुट लांब असलेली धामिन (सापाची एक जात) निघाली. ही घटना बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास औषधी वाटपाच्या ठिकाणी घडली. त्यानंतर सर्पमित्रांना बोलावण्यात आले. त्यांनी ती धामिन अलगत पकडली. जिल्हा रुग्णालयाच्या बाजुने सर्वत्र अस्वच्छता आहे. तसेच झाडाझुडपांचा विळखा आहे. याच ठिकाणी  धामिन, साप वास्तव्यास असतात. बुधवार सायंकाळी साडे चार वाजता ओपीडी सुरू होते. त्याच अनुषंगाने कर्मचारी रुग्णालयात येत होते. एवढ्यात जुना आयुष विभागाच्या तेथील शौचायालतून आठ फुट लांब आणि काळ्या रंगाची धामिन बाहेर आली आणि औषधी विभागात गेली. हे  कक्षसेवकांनी पाहिले. त्यांनी तात्काळ सर्पमित्रांना संपर्क केला. त्याप्रमाणे उंकेश सवाई, बालाजी गुरखुदे, संदीप सवाई यांनी धाव घेत तिचा शोध घेऊन तिला अलगद पकडले. एवढ्या मोठा साप निघाल्याचे पाहून रुग्णालयीन कर्मचारी, रुग्ण चांगलेच घाबरले होते. तो पकडल्यावर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.  काय म्हणतात सर्पमित्र ही धा...

गुपचुप लग्न करून तो वधुसह रुग्णवाहीकेने घरी आला

इमेज
गुपचुप लग्न करून तो वधुसह रुग्णवाहीकेने घरी आला बीड प्रतिनिधी देशव्यापी लॉकडाउन दरम्यान देशात विविध ठिकाणी अडकलेले लोक आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची चिंता देखील समजण्यासारखी आहे. मात्र, काही लोक घरी जाण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतानाही दिसत आहेत. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका तरूणाला कसेही करून लग्न करायचे होते. त्याने शक्कल लढवत वडिलांच्या आजारपणाची बतावणी केली आणि रुग्णवाहिकेतून दिल्लीला पोहोचला. तेथेच त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर तो आपल्या पत्नीला रूग्णवाहिकेत बसवूनच घरी घेऊन आला. मात्र, आता त्याचे संपूर्ण कुटुंब क्वारंटीन ठेवण्यात आले आहे.अहमद असे या २६ वर्षीय तरुणाचे नाव असून दिल्लीला जाण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स बुक केली. वडिलांच्या आजारपणाचा बहाणा सांगितल्यानंतर त्याला ड्रिप लावून स्ट्रेचरवर ठेवले गेले. वाटेत आलेल्या अनेक चेकपोस्ट आणि पोलिस चौक्यांवर त्याने खोटे बोलून, तसेच वडिलांच्या आजाराचे निमित्त सांगत अहमद दिल्लीला पोहोचला.

राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांची रिक्त जागा मुख्यमंत्र्याना का दिली नाही?

इमेज
राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांची रिक्त जागा मुख्यमंत्र्याना का दिली नाही? मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वावरुन भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात राजकारण रंगले आहे. त्यावरुन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं भाजपला वाटत असून त्यातूनच त्यांचे खटाटोप सुरू आहेत, असा थेट आरोप केला. त्या आरोपाला भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांनी देखील जाऊन भेट घेत आक्रमक झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्त्याची शिफारस मान्य करुन तातडीने नियुक्ती देण्याची मागणी राज्यपालाकडे केली होती. त्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष...

सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल !

इमेज
सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल ! बीड |  कोरोना व्हायरसच्या संकटात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या अफवाचे व्हायरस जीव घेणे ठरत आहेत याला रोखने हे पोलिसांसमोरील आवाहन आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून फेसबुक व्हॉट अँप वर अफवा पसरवणारे समाजकंटक काही कमी नाहीत,अशा अफवाखोरराना बीड पोलिसांनी थेट तुरुंगाची हवा खावी लागली. सोशल मीडिया संदर्भात महाराष्ट्रात २५० गुन्हे नोंद आहेत पुणे -२० मुंबई-१८ तर एकटया बीड जिल्ह्यात सर्वात जास्त २८ गुन्ह्याची नोंद आहे , यामुळे आता बीड मधून अफवाखोर हद्दपार होण्यास ही ब्रँच परिणामकारक ठरली आहे. २४ तास समाज माध्यमावर लक्ष ठेवनारी बीड पोलिसांची तिसरी सायबर ब्रँच कामगिरी केली आहे. फेसबुक,व्हॉट अप ,ट्विटर टिक टॉक ,यासह इतर माध्यमावर पोस्ट टाकण्या पूर्वी आणि शेअर करण्यापूर्वी ही बातमी पहा. रिकामा उद्योग करत पोलिसाचे काम वाढवनारे महानग बऱ्याच वेळा अमुक अमुक गावात कोरोना चा रुग्ण सापडला. न्यूज पेपर आणि खोट्या बातम्याचे फोटो स्किन शॉट व्हाट्स अँप वर फिरल्यामुळे अनेक अनर्थ घडले, बीड मध्ये लॉक डाऊन च्या सुरुवातीला अफवांच पेव फुटले होत. ह...

जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

इमेज
जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत गुरुवारी (दि.30) निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एन.एच. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत अमिताभ बच्चन यांनी ‘तो गेलाय.. ऋषी कपूर गेलाय.. आणि मी उध्वस्त झालोय’; केलेलं ट्विटचा स्क्रिन शॉट एएनआय या सरकारी वृत्तसंस्थेनं शेअर केला आहे.  ऋषी कपूर यांच्यावर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार करण्यात आल्यानंतर ते भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील ही दुसरी दु:खद बातमी समोर येत आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनेत्यांनी ट्विट करत शोक व्यक्त केले आहेत. तसेच त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. ऋषी कपूर यांनी जवळपास 92 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पह...

दिलासादायक ! बीडमध्ये पासधारक व्यक्तींना संचारबंदीतही बँक सेवा उपलब्ध

इमेज
दिलासादायक ! बीडमध्ये पासधारक व्यक्तींना संचारबंदीतही बँक सेवा उपलब्ध नियमित बॅँकिंग वेळामध्ये करता येणार कामकाज बीड : जिल्ह्यातील सर्व बॅँकांनी पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना बॅँकेच्या सर्व सोईसुविधा संचारबंदीच्या काळातही बॅँकेच्या कामकाजाच्या पूर्ण वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे चालन भरणारे तसेच इतर क्षेत्रातील पासधारकांना दिलासा मिळणार आहे.  कोरोना आपत्ती व्यवस्थापनांतर्गत २३ एप्रिलच्या आदेशानुसार जिल्ह्यातील जमावबंदी व संचारबंदीच्या काळात ज्या कामांना सूट देण्यात आली आहे तसेच भविष्यात सूट देण्यात येईल, अशा सर्व कामांशी थेट संबंधित व्यक्तींना व कर्मचाऱ्यांना सध्या चालू असलेल्या कोविड १९. महापोलीस. इन या संकेतस्थळाच्या आधारे पास घेता येते. परंतू या संकेत स्थळावर अर्ज करताना नियुक्त केलेल्या संबंधित शासकीय नियंत्रण अधिकाऱ्याची लेखी शिफारस असणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील बॅँकांमध्ये पास उपलब्ध असणाऱ्या व्यक्तींनादेखील विषम तारखेस सकाळी ७ ते ९.३० या वेळेतच बॅँकेशी संबंधित का...

विद्युत शॉक लागुन म्हैस दगावली

इमेज
विद्युत शॉक लागुन म्हैस दगावली वडवणी :. वडवणी तालुक्यातील खळवट लिंमगाव येथील सदाशिव विष्णुपंत आंबुरे या शेतकऱ्याच्या म्हैसीला पाणी पिण्यासाठी विहिरी कडे गेली असता विद्युत मोटारच्या स्टार्टर पेटीचा विद्युत शॉक लागल्याने म्हैस म्रुत्यु पावल्याची घटना घडली.

चोवीस तासात मालेगावात ८२ रुग्ण आढळले; अनेक पोलिसांचाही समावेश

चोवीस तासात मालेगावात ८२ रुग्ण आढळले; अनेक पोलिसांचाही समावेश चोवीस तासात मालेगावात ८२ रुग्ण आढळले; अनेक पोलिसांचाही समावेश नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर करोनाबाधितांचं हॉटस्पॉट बनलं आहे. दिवसेंदिवस इथं रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत मालेगाव शहरात करोनाचे ८२ नवीन रूग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे करोनाबाधित रुग्णांमध्ये कर्तव्यावर असलेल्या बऱ्याच पोलिसांचाही समावेश आहे. गेल्या चोवीस तासातील नव्याने वाढलेल्या या ८२ रुग्णांमुळे मालेगामध्ये आत्तापर्यंत एकूण रुग्ण संख्या ही २५३ वर पोहोचली आहे. तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २७६ वर पोहोचली आहे. तर करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत १२ जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, मालेगावकरांसाठी रविवारचा दिवस दिलासा देणारा ठरला होता. कारण, येथे उपचार घेत असलेले तीन करोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने आणि त्यांचे दोन तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने मन्सुरा कॉलेज हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यावेळी फुलांची उधळण करत या तिघा रुग्णांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार – शरद पवार

इमेज
महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार – शरद पवार महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार – शरद पवार शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला लॉकडाउनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प असून याचा विपरित परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट उभं राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे असं आवाहनही केलं. सोबतच मुंबई, पुण्यात महापालिका आणि शासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतला असल्याने संख्या वाढत असल्याचं सांगितलं. “४० दिवसांपासून सगळं काही बंद आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या, शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे. मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारचा २०२०-२१ चा जो अर्थसंलकल्प होता त्यात एकंदर राज्याचं महसूल उत्पन्न तीन लक्ष 47 हजार कोट...

हॉटेलची तपासणी का केली?”, सोलापुरात पेट्रोल टाकून पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

इमेज
“हॉटेलची तपासणी का केली?”, सोलापुरात पेट्रोल टाकून पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न “हॉटेलची तपासणी का केली?”, सोलापुरात पेट्रोल टाकून पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न सोलापूर (वृत्तसंस्था) ​सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मळोली गावात टाळेबंदी तथा संचारबंदी काळात गस्त घालणाऱ्या एका पोलीस कर्मचा-यावर हल्ला करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. अरूणसिंह फत्तेसिंह जाधव (रा.,मळोली) असं आरोपीचं नाव आहे. वेळापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी जावेद जमादार यांना परगावहून काही व्यक्ती मळोली गावात आल्याची माहिती गावच्या पोलीस पाटलांकडून मिळाली होती. यानंतर वेळापूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस शिपाई जमादार हे पोलीस मित्रासह मळोली गावात गेले. तेथे पोलीस पाटलाची वाट पाहात थांबले असता लाल रंगाच्या स्विप्ट मोटारीतून अरूणसिंह जाधव तेथे आला. त्याने पोलीस कर्मचारी जमादार यांना जातीवाचक शिव...

किराणा आणायला गेला अन् लग्न करून आला

इमेज
किराणा आणायला गेला अन् लग्न करून आला नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक मुलामुलींची लग्न खोळंबून पडली आहेत. मात्र, असे असतानाही काहीजण व्हिडिओ कॉन्फरंन्सिग द्वारे किंवा सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न करत आहेत. मात्र, दिल्लीतील गाझीयाबाद येथून लग्नाची एक वेगळीच कहानी समोर आली आहे.     लॉकडाऊनमध्ये घरातून किराणा आणण्यासाठी बाहेर पडलेला तरूण लग्न करून नववधूसह घरी परतला.प्रेयसीसोबत केले लग्न लॉकडाऊन काळात तरूण भाजी आणि किराणा आणायला गेला होता. मात्र, त्याने येताना आपल्या प्रियसीसोबत लग्न केले, आणि नववधूसह घरी परतला. मुलाने लग्न केलेले पाहून आईला धक्काच बसला. मुलाीच्या आईने दोघांना घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रकरण पोलिसांत पोहचले. मुलाची आईही पोलीस ठाण्यात पोहचली. माझ्या मुलाने लॉकडाऊनचा नियम मोडला आहे. तो किराणा आणायला गेला होता. पण लग्न करून आला. मी या मुलीला ओळखत नसून दोघांना का घरात घेऊ? असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित केला.  मंदिरात लग्न केल्याचा तरुणाचा दावा तरुणाने खरेच लग्न केला का? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मात्र, मंदिरात जाऊन लग्न केल्याचा ...

क्वारान्टीन ऊसतोड मजुरांना मोफत धान्य !

इमेज
क्वारान्टीन ऊसतोड मजुरांना मोफत धान्य ! बीड (दि. २९) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोडणी करून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांसाठी महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून आता जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना २८ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी म्हणून जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून यासाठी प्राथमिक स्वरूपात १ कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकास विभागाने यास विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यताही दिली आहे. ऊसतोडणीसाठी गेलेल्या ऊसतोड मजुरांना राज्य शासनाने धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण यशस्वी पाठपुराव्याने आपापल्या गावी परतण्यासाठी परवानगी दिली. त्यांना आपल्या गावी सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून २८ दिवसांसाठी अलगिकरणात ठेवण्यात येत आहे. अशावेळी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची परवड होऊन जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल होऊ नयेत या उद्देशाने ना. मुंडेंनी हा निर्णय घेण्याबाबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निर्देशीत केले होते . त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ...

पोलीसाची हातभट्टी विरोधात धडक मोहिम

इमेज
पोलीसाची हातभट्टी विरोधात धडक मोहिम तलवाडा पोलीसाची हातभट्टी विरोधात धडक मोहिंम तलवाडा.दि. (प्रतिनिधी) कोरोनामुळ सर्वञ दारूबंदी आसल्यांने हातभट्टी निर्मान करनार्याच्य संख्येत वाढ झालेली आसतांना तलवाडा पोलीस स.पो.नी. ऊणवने कर्मचार्यांनी तलवाडा,राजापुर,बग्गेवाडीत मोठी कार्यवाही करत हातभट्टी व रसायनाचा नायनाट केल्यांने एकच खळबळ.     गेल्या दोन महिन्यापासुन कोरोनामुळ शासनाने बार,देशी विदेशी बंद केल्यांने अवैध दारू विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झालेली आसतांना तलवाडा, राजापुर, बग्गेवाडी शिवारात मोठ मोठी हातभट्टीचे आड्डे निर्मान झाल्यांने बाहेरूंनही मागनी वाढलेली आसतांना देशी विदेशी मिळत नसल्यांने तळीरामांनी हातभट्टीकडे मोर्चा वळवलेल्यांने नागरिकांना मोठा ञास होत होता.     हातभट्टीचे विविध ठिकांनी निर्मान झालेले आड्डे तलवाडा पोलीसांनी शोधुन काढत गेल्या आठ दिवसा पासुन तलवाडा, राजापुर, व मंगळवार रोजी  स.पो.नी.ऊणवने यांच्या मार्गदर्शनाखाली.ए.एस.आय.माने, राऊत, गायकवाड यांनी बग्गेवाडी शिवारात शेतात तयार करन्यत येत आसलेल्य ठिकांनि शेतात हातभट्टी...

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन

इमेज
इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन मुंबई-  बॉलिवूड अभिनेता  इरफान खान  यांचं वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं. शूजीत यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, 'इरफान माझ्या मित्रा.. तू लढलास आणि लढलास आणि लढलास.. मला तुझा नेहमीच अभिमान वाटेल. आपण पुन्हा भेटू. सुतापा आणि बाबिल तुम्हीही लढलात. सुतापा या लढाईत तुला जे शक्य होतं ते तू केलंस. ओम शांती. इरफान खानला सलाम.' दोन दिवसांपूर्वी त्यांची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान यांना आईला शेवटचं पाहता आलं नाही. आईचं अंत्यदर्शनही त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला पाहता न आल्याचं दुःख त्यांच्या मनात होतं. गेल्या काही वर्षांपासून इरफान आजा...

टेन्शन वाढतंय; औरंगाबादमध्ये आणखी ११ नवे करोनाबाधित

इमेज
टेन्शन वाढतंय; औरंगाबादमध्ये आणखी ११ नवे करोनाबाधित टेन्शन वाढतंय; औरंगाबादमध्ये आणखी ११ नवे करोनाबाधित औरंगाबाद:  औरंगाबादमध्ये काल दिवसभरात २३ रुग्ण आढळल्यानंतर आज सकाळी पुन्हा ११ नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील करोना रुग्णांची संख्या १२०वर गेली आहे. आज सापडलेल्या ११ रुग्णांमध्ये नूर कॉलनीतील ९, गारखेडा, भीमनगर आणि भावसिंगपुरा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा १२० झाला आहे. या सर्वांना संपर्कामुळे करोना झाल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, या सर्वांच्या कुटुंबीयांना क्वॉरंटाइन करण्यात आलं असून ते राहत असलेला परिसर सील करण्यात येत आहे. भीमनगर आणि भावसिंगपुरा या परिसरात रुग्ण वाढीची संख्या अधिक असल्याने हे परिसर आधीच सील केले आहेत. दरम्यान, सोमवारी २७ एप्रिल रोजी दुपारपर्यंत येथील बाधितांचा आकडा ५३ होता. मात्र सोमवारी सायंकाळी एकाचवेळी २९ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत एकूण बाधितांचा आकडा ८२ झाला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये आणखी १३ बाधित नव्याने आढळून आल...

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण*

* महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण*      बीड, दि.29 :- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात 'महाराष्ट्र दिन' हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करणेबाबत निर्देश प्राप्त झाले  आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त शुक्रवार दि. 1 मे , 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सकाळी 8 वाजता  आयोजित करण्यात आला असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.             शासन परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे ध्वजारोहणाच्या वेळी पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद हे उपस्थित राहतील. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  उपस्थित राहु नये.  तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालये व तहसील कार्यालये येथे ध्वजारोहण...

गांधी नगर भागात पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल!

इमेज
गांधी नगर भागात पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल! गांधी नगर भागात पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल! बीड / प्रतिनिधी शहरातील गांधी नगर भागात  बारा दिवस,तेरा दिवसाला नळाला पाणी येत आहे सध्या रमजान महिना सुरू आहे.असा असताना सुद्धा तेरा दिवसाला नळाला पाणी येत आहे  गांधी नगर मधील दिलावर नगर,अख्तर नगर या भागात किमान ८ दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी होऊ लागली आहे.सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असल्याने गांधी नगर, अख्तर नगर ,दिलावर नगर या भागात आठ दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पीआय साहेबांच्या प्रेमापोटी दबंगगिरी करणार्‍या महिलेविरोधात गुन्हा

इमेज
पीआय साहेबांच्या प्रेमापोटी दबंगगिरी करणार्‍या महिलेविरोधात गुन्हा अंमळनेर (प्रतिनिधी) : पोलिस निरीक्षका यांच्याविरुद्धची नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे केलेली तक्रार मागे घे, नाही तर जिवंत मारून टाकीन,’ असे म्हणत पीआय साहेबांच्या प्रेयसीने एका तक्रारदार महिलेला लाथाबुक्क्यानी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे घडला. सदर महिलेविरोधात अंमळेनर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ज्योती धनराज भोई (रा. पैलाड) यांनी अंमळनेर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार  ज्योती भोई शुक्रवारी सकाळी सहा वाजता घरात झोपलेल्या होत्या. त्याचवेळी हातात लाकडी दांडके घेऊन एक महिला तेथे आली. ज्योतीच्या आईला तिने मैत्रीण असल्याचे सांगितले व ज्योतीला पोलिस निरीक्षक यांची पत्नी असल्याचे सांगितले. मात्र, ज्योती यांनी, तू त्यांची पत्नी नाही. मी त्यांना एका कार्यक्रमात पाहिले आहे,’ असे सांगितले. त्यावर तिने, आपण वाघ यांची प्रेयसी शबनम ऊर्फ शमिना मोमीन (रा. केडगाव, नगर) असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक वाघ यांच्याविरुद्ध नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे केलेली ...

बीडमध्ये आठ ऊसतोड मजुरांचे स्वब घेतले

इमेज
बीडमध्ये आठ ऊसतोड मजुरांचे स्वब घेतले बीड: बाहेर जिल्ह्यातून आलेल्या आठ ऊसतोड मजुरांचे स्वब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात घेण्यात आले आहेत. आज सायंकाळपर्यंत त्यांचे रिपोर्ट येणे प्रशासनाला अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. येथील मातोरी चेक पोस्टवरून या मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केलेला होता. त्यावेळी त्यांच्या अंगात ताप असल्याचे दिसून आले. त्यामुळे लागलीच त्यांच्या स्वबचे नमुने घेण्यात आले आहेत. आजपर्यंत बीड जिल्ह्यात एकही possitive रुग्ण आढळून आलेला नाही. जो आढळला तो नगर जिल्ह्यात उपचारासाठी होता. त्यामुळे आता या मजुरांच्या रिपोर्ट कडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तीन शिक्षकांसह सहा जणांवर गुन्हा

इमेज
तीन शिक्षकांसह सहा जणांवर गुन्हा बीड(प्रतिनिधी): देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री घरा बाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन करत आहे. या नियमाचे सर्वजण पालन करत आहेत. परंतु सध्या गुरुजींचे मन मात्र घरात रमत नसल्याचे पोलिसांच्या कारवाई वरून दिसत आहे. कधी जुगार अड्डा, कधी दारू पिताना गुरुजी पकडले जात आहेत. बीड तालुक्यातील म्हसोबा फाटा परिसरात एका आलिशान गाडीमध्ये दारु पिताना तीन शिक्षकासह सहा जणांना पकडून त्यांच्यावर बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      विवेक आसाराम गव्हाणे, शरद महारुद्र गव्हाणे, पंढरीनाथ दिलीप नवले या तीन शिक्षकासह वैभव विष्णुदास डेंगळे, शिवराज संदीप बहिर, ज्ञानेश्वर रामदास डेंगळे हे म्हसोबा फाटा परिसरात एका इनोव्हा (एमएच 12 एमडब्लू 4967) गाडीमध्ये दारू पित बसले होते. बीड ग्रामीण पोलीस गस्तीवर असताना सहज यांची चौकशी केली. यावेळी यांच्याकडे कुठलाही अत्यावश्यक पास नव्हता, फक्त दारू पिण्यासाठी घराबाहेर पडले असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून दारूचे ग्लास, दारु जप्त करत कलम 188, 269, 270 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब), मह...

राज्यपालांनी निर्णय न घेतल्यास पुन्हा शपथविधी

इमेज
राज्यपालांनी निर्णय न घेतल्यास पुन्हा शपथविधी मुंबई / प्रतिनिधी राज्याच्या मंत्रमंडळाने राज्यपालनीयुक्त सदस्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या नावाची शिफारस केली असताना राज्यपाल यावर काहीच निर्णय घेत नसल्याने महाविकास आघाडीचे नेते संतप्त झाले असून त्यांनी आज राज्यपालाची भेट घेऊन पुन्हा एकदा हीच मागणी केली आहे.राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी कला साहित्य क्षेत्र पाहिजे तर उद्धव ठाकरे छायाचित्रकार आणि संपादक आहे पण जर तेही मेनी न केल्यास सरकार पुन्हा एकदा ठाकरेंना नेता निवडतील आणि त्याच्यासह सर्वच मंत्रिमंडळाचा शपथविधी घेतला जाईल व पुन्हा ६ महिन्याचा अवधी असेल असे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नमूद केले आहे. राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाले असून राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलस...

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः सह इतरांचाही जीव जपावा -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून    स्वतः सह इतरांचाही जीव जपावा        -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर औरंगाबाद,दि.28- औरंगाबाद शहरात  कोरोना रूग्ण संख्या नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.मात्र रूग्णांची संख्या वाढत आहे. हा संसर्ग वेळीच रोखणे सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे.तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः सह इतरांचाही जीव जपावा, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज येथे केले.         विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कोरोना संसर्ग रोखण्याबाबतच्या  बैठकीत श्री.केंद्रेकर बोलत होते.यावेळी ,खा.इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह  कोरोना बाधित क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते,मौलवी, लोकप्रतिनिधी ,संबंधित अधिकारी उपस्थित होते.  ------------------------------------------------------------------  चौकट        खा.जलील यांनी  नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत सर्वांच्या संरक्षणासाठी नियमांचे अधिक कटाक्षाने पाल...

कोरोनाच्या लढाईत योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी करवसुलीच्या टक्केवारीची अट शिथील- ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती

कोरोनाच्या लढाईत योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी करवसुलीच्या टक्केवारीची अट शिथील - ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती   मुंबई, दि. २८ - राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२० – २१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. गावांमधील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना चालू वर्षी करवसुलीशी निगडीत वेतन न देता किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. मागील वर्षी राज्यात आपत्ती, पुरपरिस्थिती अशी संकटे उद्भवली होती. तसेच सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये सर्व प्रकारची करवसुली कमी झालेली आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गावागावांमध्ये आदर्श असे काम केले आहे. वेतनाच्या सध्या प्रचलीत पद्धतीनुसार त्यांचे वेतन करवसुलीच्या टक्केवारीशी जोडल्यात येते. सध्...

जिल्हाधिकारी रेखावार यांची कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

इमेज
 जिल्हाधिकारी रेखावार यांची कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त बीड : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेत जिल्हा प्रशासन व्यस्त असल्याचा वाळूमाफियांनी फायदा उठवला आहे. माफियांनी गेवराई तालुक्यात गुंतेगाव परिसरात वाळूचा मोठा साठा केला होता. याबाबत बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी झाडाझडती घेतली असता वाळूसाठ्यासह अन्य साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.    गेवराई तालुक्यातील गुंतेगाव परिसरात वाळू माफियांनी साठा करण्यास सुरवात केल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांना मिळाली होती. त्यांनी पाहणी केली असता नदीपात्रात वाळूचा साठा, त्याठिकाणी चार टॅ्रक्टर, एक ट्रॉली आढळून आली. याशिवाय अन्य काही जप्त करण्यात आले असून गेवराई पोलिसांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाईचे त्यांनी निर्देश दिले आहेत. घटनास्थळी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्यास महसूलचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी आहेत.

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले, कुटुंबियांना मोठा दिलासा

इमेज
कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले, कुटुंबियांना मोठा दिलासा बीड :   राज्य सरकारच्या परवानगीनंतर  बीड जिल्हा प्रशासनाने राजस्थानच्या कोटा येथे लॉकडाऊनदरम्यान अडकलेल्या 60 विद्यार्थ्यांना अखेर बीड शहरात आणलं आहे (Students stranded in Kota returned to Beed). कोटामध्ये अडकलेले बीड जिल्ह्यातील 60 विद्यार्थी आज दुपारी दोन वाजता शहरात दाखल झाले. एका खासगी ट्रव्हल्सने त्यांना राजस्थानातून बीड शहरात आणण्यात आलं. विद्यार्थी परत आल्याने कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे (Students stranded in Kota returned to Beed). बीड शहरात दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना बस स्थानकाच्या पाठिमागे असणाऱ्या रोडवर सोडण्यात आलं. तिथे शिवाजीनगर पोलीस आधीपासून दाखल झाले होते. पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेलं. चौकशीनंतर सर्वांना घरी सोडण्यात आलं. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. देशात सध्या सामान्य नागरिकांना कुठेही येण्या-जाण्यास, प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 2 हजार विद्यार्थी हे राजस्थानमधील कोटा येथे ...

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इमेज
जयभवानीने दिले व्हेंटिलेटर ! गेवराई (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तीन व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी व्हेंटिलेटर स्वीकारले. आपत्तीच्या प्रसंगात नेहमीच अमरसिंह पंडित आणि शिवछत्र परिवार सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून येतात, महापूर असेल किंवा इतर कोणत्याही संकटात त्यांच्याकडून सदैव मोठी मदत होते. कोरोनाच्या संकटात सुध्दा त्यांनी यापूर्वी पाच हजार गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. जय भवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक व इतर कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा आरोग्य विभागाला तीन व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन व्हेंटिलेटर उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित व कर्मचारी प्रतिनिधी ...