पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बीड मध्ये पडत्या पावसात अवघ्या एक तासांत बदलले रोहीत्र

इमेज
बीड मध्ये पडत्या पावसात अवघ्या एक तासांत बदलले रोहीत्र  बीड प्रतिनिधी: शहरातील नगररोड परिसरातील रोहित्र बिघडल्याने नगर रोड भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. उन्हाळ्याच्या उकाडा आणि ऐन संचार बंदीच्या काळात सर्वच नागरिक घरात असल्याने  आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे प्रचंड त्रास जाणवू लागला होता. लहान बालके आणि वयोवृध्दासह नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागला. या परिसरातील नागरिकांनी तत्काळ  काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष श्री प्रशांत पवार यांच्याशी संपर्क साधून विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. सदैव जनहितासाठी तत्पर असलेले काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष श्री. प्रशांत पवार यांनी तत्काळ संबंधित विद्युत खात्याशी फोनवरून माहिती देऊन रोहित्र बदलण्याची विनंती केली. त्यानंतर श्री. प्रशांत पवार यांच्या एका फोनवरून एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनी कसलाही वेळ न दवडता पडत्या पावसामध्ये अवघ्या एका तासात हे रोहीत्र बदलुन नगर रोड परिसरातील खंडित झालेला वीजपुरवठा तत्काळ सुरळीत केला. बिघडलेले रोहित अवघ्या एका तासात पडत्या पावसात बदलून त्या जागी नवीन रोहित्र ...

कीर्तीताई दुग्गड मैत्रीणींचा बी.सी ग्रुपमुळे जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला मिळाले बळ !

इमेज
कीर्तीताई दुग्गड मैत्रीणींचा बी.सी ग्रुपमुळे जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला मिळाले बळ ! *आत्माराम वाव्हळ|बीड* बीड शहरातील भाजी मंडई परिसरातील बीड नगर परिषद आणि रेणुका माऊली सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने बेघर अनाथ मतिमंद अपंग व्यक्तींसाठी जिव्हाळा बेघर निवारा केंद्र  सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात सुरूवातीला बीड शहरातील विविध भागातून २५ ते ३० बेघर अनाथ मतिमंद अपंग भोळसर वेडसर समाजाने कुटूबांने सोडून दिलेल्या व्यक्तींना आधार दिला. या आधार केंद्राचे व्यवस्थापक राजू वंजारे यांनी कुटुंबातील कर्त्यापुरुषा प्रमाणे या बेघर निवारा केंद्रातील सदस्यांचा सांभाळ करायला सुरुवात केली. त्यांच्या या कार्याची शासनासह समाजसेवी संस्थांनी दखल घ्यायला सुरुवात केली. समाजातील थोर व्यक्तीने नुसती दखलच घेतली नाही तर अनेक दानशूर व्यक्तींनी भरभरून मदतीचा हात पुढे केला आहे.  दानशूर व्यक्तीं कडून मिळालेल्या मदतीने राजू वंजारे यांनी निराधार बेघर लोकांची सेवा करण्यात तत्पर होते. अखंडितपणे त्यांनी सेवेचा महायज्ञ सुरु केला. परंतु मागील काही दिवसापासून  जगातील जवळपा...

शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडूनमुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी जमा*

इमेज
* शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी जमा* मुंबई, प्रतिनिधी : -  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनानुसार शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून आज  मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी रुपये जमा करण्यात आले.     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्री साई संस्थानाने ५१ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले होते. संस्थानाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वागत केले होते आणि आभारही मानले होते. निर्णयानुसार संस्थानाने आज ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली. ०००

*श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये*

इमेज
*श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये* मुंबई प्रतिनिधी : -  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दानशूर, संस्था आदी घटक पुढे येत आहेत. राज्यातील प्रथितयश संस्था असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ साठी एक कोटी रुपये देऊ केले आहेत.       श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाइतका सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी म्हटले आहे. हा निधी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन  कोरोनाच्या संकटाचा धैर्याने आणि कौशल्याने सामना करीत आहे, या प्रयत्नांना साथ देण्यासाठी विवेकानंद संस्था पुढे आल्याचे कळवले आहे.  ______...

करोना प्रतिबंधासाठी कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्तींना मिळणार १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम आणि २५ लाखाचे विमा संरक्षण- ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती

इमेज
* करोना प्रतिबंधासाठी कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्तींना मिळणार १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम आणि २५ लाखाचे विमा संरक्षण* *- ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती* मुंबई प्रतिनिधी : सध्या करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. याशिवाय केंद्र शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या ५० लाख रुपयांच्या विम्याच्या धरतीवर या कर्मचाऱ्यांचा ९० दिवसासाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरविण्यासही मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भातील परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ग्रामीण पातळीवर या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण...

धनंजय मुंडेंचा परळीकरांसाठी आणखी एक निर्णय; डाबीसह आता दाऊतपुरवरूनही होणार वीजपुरवठा**विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ना. मुंडेंनी केले कौतुक*

इमेज
* धनंजय मुंडेंचा परळीकरांसाठी आणखी एक निर्णय; डाबीसह आता दाऊतपुरवरूनही होणार वीजपुरवठा* *विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ना. मुंडेंनी केले कौतुक* परळी (दि.३१) ----: परळी शहराला वीजपुरवठा करणाऱ्या डाबी येथील १३२ केव्ही सबस्टेशन मध्ये काही फॉल्ट झाला की परळी शहर अंधारात असायचं! परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आता यावर पर्यायी उपाय काढला आहे. आता परळी शहरासाठी सिमेंट फॅक्टरीकडे येणारी दाऊतपूर ३३ के.व्ही. वीज लाईन कालरात्री देवी सबस्टेशनला जोडण्यात येणार आहे. यामुळे डाबी सबस्टेशनला आता पर्यायी व्यवस्था होणार असून, डाबी कडील वीज पुरवठ्यात काही अडथळा निर्माण झाला तरी परळीकरांना अखंडित वीज मिळणार आहे. याबाबत ना. धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आज (दि.३१) बीड महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सरग व अंबेजोगाई विभागाचे कार्यकारी अभियंता कुरेशी यांनी या कामाची पाहणी केली यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता जिलानी व कटके हेही उपस्थित होते. सध्या परळी शहराला डाबी १३२ केव्ही या एकाच सबस्टेशनवरून वीज पुरवठा केला जातो. या सबस्टेशनला काही अडथळा निर्माण झाला तर प...

दुचाकी स्लिप होऊन गंभीर जखमी झालेल्या त्या बँक कर्मचाऱ्याला बीड ग्रामीण पोलिसांनी केली मदत

दुचाकी स्लिप होऊन गंभीर जखमी झालेल्या त्या बँक कर्मचाऱ्याला बीड ग्रामीण पोलिसांनी केली मदत बीड प्रतिनिधी: जामखेड येथील महाराष्ट्र बँकेतील एक कर्मचारी दुचाकीवरून बीडला येत असताना त्यांची दुचाकी नगर रोडवर स्लीप झाल्याने अपघात झाला. या अतघातात ते गंभीर जखमी झाले असून जिल्हा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.   या बाबत अधिक माहिती अशी की जामखेड येथील महाराष्ट्र बँकेत कार्यरत असणारे कर्मचारी आपल्या दुचाकीवरून बीडला येत होते. दरम्यान त्यांची दुचाकी नगर रोडवरील आ. संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्या समोर येताच स्लीप झाल्याने अपघात झाला. सदरील दुचाकीस्वार कर्मचारी रोडवर आदळल्याने तयाच्या डोक्याला, नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या बीड शहरामध्ये करोना प्रादुर्भाव वाढु नये या करिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रस्त्यावर कुणीच नसल्याने सदरील जखमीला  लवकर मदत मिळत नव्हती. दरम्यान  बीड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल सानप, वाहन चालक सुरवसे, हे नगर रोडवर पेट्रोलिंग करत असताना त्यांना सदर अपघाताचे दृश निदर्शनास आले.  तत्का...

*कोरोनाबाबतच्या माहिती व समस्या निवारणासाठी मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय हेल्पलाईन क्रमांक*

*कोरोनाबाबतच्या माहिती व समस्या निवारणासाठी मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय हेल्पलाईन क्रमांक* औरंगाबाद, (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मराठवाडा विभागामध्‍ये सर्व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. कोरोनाबाबत माहिती व समस्या निवारणासाठी संपर्काकरीता नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइनचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय  0240- 2331077 ,   बीड जिल्हाधिकारी कार्यालय 02442-222604 , परभणी जिल्हाधिकारी कार्यालय 02452-226400 ,  हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय 02456-222560 , लातूर जिल्हाधिकारी कार्यालय 02382-246803 ,  नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय 02462-235077 , उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय  02472-225618 , जालना जिल्हाधिकारी कार्यालय 02482- 223132 .  ज्यांना कोरोना संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी वरील हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

*कोरोनाच्या चाचण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा*. *दिवसाला होऊ शकतात ५५०० चाचण्या*- *आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती*

इमेज
*कोरोनाच्या चाचण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा* *दिवसाला होऊ शकतात ५५०० चाचण्या* - *आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती* मुंबई, प्रतिनिधी: राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात आतापर्यंत ६३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून ५९११ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.      कोरानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने तातडीने शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.  सध्या राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज २३०० चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होईल,...

तंबाखू, सिगारेटच्या गोडाऊनवर पोलीसांचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
तंबाखू, सिगारेटच्या गोडाऊनवर पोलीसांचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल बीड प्रतिनिधी : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली असतांना  बीड शहरातील दोन नामांकित दुकानदार खुलेआम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतांना आढळून आले. मंगळवारी (दि.31) सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा मारला. यावेळी दीड लाखांचे तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना तंबाखू शिवाय कुठलेच काम होत नाही अशा तलफीवाल्यांची मोठी पंचाईत होणार आहे.   शहरातील मोंंढा परिरसरात असलेले सार्थक सेल्स व खुशी टे्रडींग या दोन दुकानामध्ये मोठ्या प्रमाणा तंबाखुजन्य पदर्थांची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावेळी त्या ठिकाणी पाळत ठेवून छापा मारला असता सार्थक सेल्स दुकानामध्ये सुर्याछाप तंबाखू,कोंबडा बीडी, जर्दा तंबाखू, ए-10 कंपनीचे सिगारेट, गोल्डफ्लॅक सिगारेट, गायछाप असा 1 लाख 39 हजार 660 व खुशी ट्रेडिंग दुकाना...

कनिका कपूरच्या तब्येतीबाबत आला नवा रिपोर्ट; पाचव्यांदा पॉझिटिव्ह

इमेज
कनिका कपूरच्या तब्येतीबाबत आला नवा रिपोर्ट; पाचव्यांदा  पॉझिटिव्ह लखनऊ वृत्तसंस्था: कनिका कपूरची आता तब्बल पाचव्यांदा कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली आहे. याआधीच्या सगळ्याच चाचणीत तिला कोरोना झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण तरीही आता पाचव्यांदा तिची चाचणी करण्यात आली आहे. पाचवी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली असल्याने तिच्या कुटुंबियातील मंडळी चिंतेत आहेत. पण घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे. कनिकावर लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे डायरेक्टर आर.के. धिमान यांनी काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, कनिकाचे दोन रिपोर्ट जोपर्यंत निगेटिव्ह येत नाहीत, तोपर्यंत तिच्यावर उपचार सुरूच राहाणार आहेत.  कनिका कपूरचे कोरोनाचे रिपोर्ट सगळ्यात पहिल्यांदा पॉझिटिव्ह आल्यानंतर ते रिपोर्ट कनिकाचेच आहेत का असा प्रश्न तिच्या घरातल्यांना पडला होता. कारण या रिपोर्टमध्ये मुलगीऐवजी मुलगा असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामु...

32 लोकांना घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला

इमेज
32 लोकांना घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला बीड प्रतिनिधी : संचारबंदीचे उल्लंघन करुन कसल्याही प्रकारची परवानगी न घेता 32 लोकांना घेऊन परराज्यात जात असलेला हा कंटेनर  बीडच्या पोलिसांनी मांजरसुंबा येथे पकडला आहे.   लोकांना घेऊन पाटोद्याकडून बीडकडे जात असलेला कंटेनर (क्र.एच.आर.38 व्ही 0866) मांजरसुंबा येथील चौकात पोलिसांनी दुपारी 12 वाजता तपासणीसाठी थांबविला असता त्यात 32 जण आढळून आले. यात महिला, पुरुष, बालके यांचा समावेश आहे. त्यानंतर नेकनूरचे सपोनि.सचिन पुंडगे यांना माहिती देण्यात आली. यावेळी तलाठी केकाण, ग्रामसेवक जाधव यांच्यासह आरोग्य पथकाने भेट दिली होती.

32 लोकांना घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला

इमेज
32 लोकांना घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला बीड प्रतिनिधी : संचारबंदीचे उल्लंघन करुन कसल्याही प्रकारची परवानगी न घेता 32 लोकांना घेऊन परराज्यात जात असलेला हा कंटेनर  बीडच्या पोलिसांनी मांजरसुंबा येथे पकडला आहे.   लोकांना घेऊन पाटोद्याकडून बीडकडे जात असलेला कंटेनर (क्र.एच.आर.38 व्ही 0866) मांजरसुंबा येथील चौकात पोलिसांनी दुपारी 12 वाजता तपासणीसाठी थांबविला असता त्यात 32 जण आढळून आले. यात महिला, पुरुष, बालके यांचा समावेश आहे. त्यानंतर नेकनूरचे सपोनि.सचिन पुंडगे यांना माहिती देण्यात आली. यावेळी तलाठी केकाण, ग्रामसेवक जाधव यांच्यासह आरोग्य पथकाने भेट दिली होती.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 60 टक्के कपात !

इमेज
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 60 टक्के कपात !   मुंबई, दि. 31 :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. ‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत...

तहसिलदार डाॕ.प्रतिभा गोरे यांच्या उपस्थितीत आधार मल्टिस्टेटच्या वतीने भटक्या विमुक्त लोकांना राशन वाटप

इमेज
तहसिलदार डाॕ.प्रतिभा गोरे यांच्या उपस्थितीत आधार मल्टिस्टेटच्या वतीने भटक्या विमुक्त लोकांना राशन वाटप                         माजलगाव  ( प्रतिनिधी ) येथील आधार मल्टीस्टेट च्या वतीने च पालावरील भटक्या लोकांना तहसिलदार डाॕ.प्रतिभा गोरे यांच्या उपस्थितीत जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. या वेळी आधारचे चेअरमन अॅड सुनिल सौंदरमल यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.    अॅड.सुनिल सौंदरमल हे आपल्या   आधार मल्टीस्टेटच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी सतत पुढाकार घेत आहेत. सध्या देशावर  आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्यासह देशात लॉक डाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. या  लाॕक डाऊन परिस्थितीत  ज्यांचे हातावर पोट आहे अशा गोर गरिब मजुर भटक्यानां काम धंदा नसल्याने त्याच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ येत आहे. या गोरगरीब जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन या कुटुंबातील नागरिकांना खाण्याच्या  वस्तु मोफत वाटण...

पंतप्रधान सहायता निधीसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून २५ लाख!

इमेज
पंतप्रधान सहायता निधीसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून २५ लाख! मुंबई दि. 30 —- राजकीय जीवनात काम करत असताना पंकजा मुंडे यांची सामाजिक बांधिलकी आणि वंचित घटकांसाठी त्यांची असलेली तळमळ नेहमीच दिसून आली आहे, त्यांच्या समाजाप्रती असलेल्या अशाच एका कर्तव्यदक्षतेचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी पंतप्रधान सहायता निधीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने २५ लाख रुपये इतका निधी त्यांनी दिला आहे. संपूर्ण देशात कोरोना विषाणूने सध्या थैमान घातले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करून देशातील जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना करिता मोठा निधी जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला ‘पीएम केअर फंड’ साठी हाक दिली. या हाकेला तात्काळ प्रतिसाद देत पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे २५ लाख रुपयांचा निधी देऊ केला. कोरोना विरूध्दची लढाई जिंकण्यासाठी देशातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हिच आमच्यासाठी सध्या महत्वाची बाब आहे असे ट्विट करत त्यांनी...

कराल एप्रिल फुल तर होईल जेल

कराल एप्रिल फुल  तर होईल जेल बीड प्रतिनिधी:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन १ एप्रिल रोजी फेक मॅसेज व्हायरल करणार्‍यास पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे १  एप्रिल फुल साजर करणे एखाद्याला थेट जेलमध्ये सुद्धा पाठवू शकते करीता कोणी ही एप्रिल फुल चे मेसेज सोशल मीडियाद्वारे व्हायरल करू नये अन्यथा जेलची हवा खावी लागेल.  त्यामुळे यंदाचा एप्रिल फुल डे टाळणे हिताच्या ठरेल आहे.  1 एप्रिल दिवस जवळ आला आहे. त्यादिवशी एप्रिल फुल डे असतो. त्याच दिवसाला ‘मुर्ख दिवस’ असे देखील म्हटले जाते. या दिवशी आपण काहीतरी ‘प्रँक’ करत असतो. तसेच, व्हॉट्सअ‍ॅपवरुन काहीतरी माहिती प्रसारित करुन एकमेकांची फसवाफसवी करत असतो. यंदा मात्र असा खोटारडेपणा करणे टाळावा लागणार आहे. कारण आपला व्हॉट्सअ‍ॅपवरील एप्रिल फुलचा एक मॅसेज तुम्हाला जेलची हवा दाखवू शकतो.     सध्या भारतावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. या संकटात सर्वत्र लॉकडाऊन आहे. कोरोनाच्या धास्तीने प्रत्येकजण घरात असून मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आधिच अफवांचे सत...

वीज पडून एक शेतकरी ठार एक जखमी

वीज पडून एक शेतकरी ठार एक जखमी    माजलगावः तालुक्यातील पिंपळगाव (नाकले) शिवारात शेतातील गहू काढत असतांना विजेच्या कडकडाट होऊन वीज पडली. यात एक 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर एकास विजेचा धक्का बसल्याने तो बेशुद्ध असून त्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.     माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव (नाकले) शिवारात अवकाळी वातावरणाचा फटका बसला. संपूर्ण माजलगाव तालुक्यात दुपारी 3 वाजण्याच्या सुमार पासून मोठ्या प्रमाणावर मेघ गर्जना आणि विजेच्या कडकडाट सुरु झाला. सद्य स्थितीत शेतकऱ्यांची  शेतमालाच्या काढणीसाठीची लगबग सुरु आहे. त्यातच पिंपळगाव (नाकले) शिवारात रुपेश माने (वय 30), झनक काळे (वय 40) हे शेतात गहू काढत होते. यावेळी रुपेश माने यांच्या अंगावर वीज कोसळली त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर झनक काळे यांना विजेचा धक्का बसल्याने त्यात ते बेशुद्ध झाले असून त्यांच्यावर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या अस्तित्वासाठी: सत्ताधारी विरोधीकांसह जनतेची एकजूट महत्वाची--उपमुख्यमंत्री अजित पवार

इमेज
‘ कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या अस्तित्वासाठी: सत्ताधारी विरोधीकांसह जनतेची एकजूट महत्वाची--उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 30 :- ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी सत्तारुढ, विरोधीपक्षांसह तमाम जनतेची एकजूट महत्वाची आहे. ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या सीमेपलिकडचा मानवजातीच्या अस्तित्वाचा लढा असल्यानं या लढाईत एकजूटीने, एकाच दिशेने प्रयत्नांची गरज आहे. वैयक्तिक स्वार्थ, पक्षीय मतभेद तूर्तास बाजूला ठेवून ‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्यात सर्वजण एकजूटीने प्रयत्न करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाधित रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे सांगून यापुढचे दोन आठवडे नागरिकांनी भेटीगाठी, गर्दी टाळून घरातच थांबावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात काम करणाऱ्या परराज्यातील मजूरांनी जीव धोक्यात घालून प्रवास करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. परराज्यातील मजूरांसाठी राज्यात ठिकठिकाणी शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. मजूरांच्या गरजेनुसार आता जिथे ते आहेत त्याठिकाणी प्रशासनातर्फे निवास आणि भोजनाची मोफत सोय करण्यात...

नाशिकमधील ‘त्या’ दानशूर शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

इमेज
नाशिकमधील ‘त्या’ दानशूर शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार मुंबई : करोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. वैद्यकीय आघाडीवरही युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. करोनाशी लढा देण्यासाठी राज्यात संचारबंदी आणि सीमाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल होत आहेत. हे पाहून नाशिकच्या दत्ता राम पाटील या एका मध्यवर्गीय शेतकऱ्याने आपल्या तीन एकरांपैकी एका एकरात पिकवलेला गहू गरजू व्यक्तींना वाटप केला. त्यांच्या या दानशूरपणाचे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुक केले असून त्याचे आभार मानले आहेत.

परराज्यातील कामगार, कष्टकरी यांची पूर्ण काळजी घेणार कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा सुरू गर्दी कमी करा अन्यथा आणखी कठोर पावले टाकावी लागतील- मुख्यमंत्री ठाकरे

इमेज
*परराज्यातील कामगार, कष्टकरी यांची पूर्ण काळजी घेणार* *कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा सुरू*  *अजूनही गर्दी कमी करा अन्यथा आणखी कठोर पावले टाकावी लागतील- मुख्यमंत्री*   मुंबई दिनांक २९: जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची कमी नाही, त्यांची दुकाने बंद नाहीत तरी विनाकारण काही लोक बाहेर पडताहेत, पोलीसांशी हुज्जत घालत आहेत, कृपया असे करू नका, घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजून ही गर्दी थांबवा, कठोर पाऊले टाकायला भाग पाडू नका असे म्हटले आहे. आज थेट प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते *सर्वांचे सहकार्य* आजपर्यंत राज्यातील सर्व जनतेने संयमाचे अतुलनीय दर्शन घडवले आहे ते पुढेही काही दिवस कायम ठेवा, घरात राहा, विरंगुळ्याचे, कुटुंबियांसमवेतचे क्षण अनुभवा असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य आहे. पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा, प्रकाश जावडेकर , विरोधीपक्ष नेते, मंत्रीमंडळातील सहकारी, राज ठाकरे माझ्याशी चर्चा करत आहेत, सर्वजण या प्रश्नावर एकत्र येऊ...

नांदूर घाट मध्ये रक्तदान शिबीर संपन्न

इमेज
नांदूर घाट मध्ये रक्तदान शिबीर संपन्न नांदूर घाट (प्रतिनिधी) नांदूर घाट येथील आझाद हिंद मित्र मंडळाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात  डॉ. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात  51 जणांनी रक्तदान केले.   देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात कोरोनाग्रस्तांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे दानशूर रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे अवाहन राज्याचे आरोग्य मंत्री. राजेश टोपे यांनी केले होते. आरोग्य मंत्री टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशसेवा करण्याची संधी रक्तदानाच्या  माध्यमातून नांदूरघाटवासियांना  मिळाली असे समजून नांदुर घाट वाशीयांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे नियोजन शासनाच्या नियमानुसार काटेकोरपणे करण्यात आले होते.  3 फुटावर एक व्यक्ती या प्रमाणे नियोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीर विद्या तारळकर, आयुष्य शेख, शंकर तारळकर, विठ्ठल पुरी, निलेश तारळकर, व मित्र प...

कोरोना’च्या तिसऱ्या टप्प्यापासून वाचण्यासाठी जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

इमेज
' कोरोना’च्या तिसऱ्या टप्प्यापासून वाचण्यासाठी जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा  उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 29 :- राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समुहसंसर्गाची लक्षणे अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘कोरोना’संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो. त्यासाठी राज्यातील जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.  राज्यात आज सात नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १९३ झाली आहे.  जनतेने घरातंच थांबून योग्य काळजी घेतल्यास, खरेदीची गर्दी टाळल्यास, विलगीकरण केलेल्या संशयित रुग्णांनी सूचनांचे पालन केल्यास आपण निश्चितपणे ‘कोरोना’ला रोखू शकतो. त्यासाठी राज्यातल्या प्रत्येकानं यापुढचे किमान दोन आठवडे घराबाहेर न पडण्याचा संकल्प करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले आहे. सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 24 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील व्यापाऱ्यासह कुटुंबातील...

करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्नपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मजुरांच्या हातचे कामही गेले. सुरक्षा की भूक पर्याय निवडीबाबत पेच; सरकारची मदत तातडीने मिळण्याची अपेक्षा

इमेज
‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मजुरांच्या हातचे कामही गेले. सुरक्षा की भूक पर्याय निवडीबाबत पेच; सरकारची मदत तातडीने मिळण्याची अपेक्षा नागपूर :  राजाने मारले, पावसाने झोडपले तर फिर्याद तरी कुठे करायची असा सवाल उभा राहतो तेव्हा उत्तरच सापडत नाही.. हाच प्रसंग आता हातमजुरांवर उभा ठाकला आहे. आठ दिवसांपासून हाताला काम नसल्याने घरातील अन्नधान्यही संपत आहे. सरकारने पॅकेजची घोषणा केली असली तरी ते कधी आणि कसे मिळेल हे माहिती नाही. त्यामुळे अशीच स्थिती राहिली तर करोना विषाणू आधी भूकच आमच्यासारख्यांचा जीव घेईल, अशी भीती मजूर व्यक्त करीत आहे.     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मजुरांच्या हातचे कामही गेले. लॉकडाऊनला सहा दिवस झाले. कुठल्याही बंदीचा सर्वात मोठा फटका हा मजूरवर्गाला बसतो. अगदी तुटपुंज्या मजुरीवर ते काम करीत असल्याने आठवडाभर पुरेल एवढेच अन्नधान्य घरात भरून ठेवतात. मात्र, हाताला कामच नसल्याने त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा आहे. मजुरांच्या या व्यथांचा आढावा घेतला असता सरक...

स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीलाउद्या दि. ३० मार्च पासून 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

इमेज
स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला उद्या दि. ३० मार्च पासून 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.   मुंबई : 'दर्या, नभामधून, सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला.... ' हा आवाज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या कानावर पडणार आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. त्यामुळे सर्व मालिकांच्या शूटींग देखील रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता जुन्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'स्वराज्यरक्षक संभाजी'. या मालिके अल्पावधीतच  प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 'स्वराज्यरक्षक संभाजी' पुन्हा एकदा झी मराठी  वाहिनीवर प्रसारित करण्यात आहे.         उद्या दि. ३० मार्च पासून 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दुपारी ४ वाजता मालिका प्रसारित होईल.  ४ ते ८ या वेळेत ही मालिका प्र...

टाटा'कडून तब्बल १,५०० कोटींची मदत, टाटा सन्सने दिले आणखी १ हजार कोटीशिर्डीच्या साई मंदिर ट्रस्टकडून कोरोनाच्या लढाईसाठी ५० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे

इमेज
' टाटा'कडून तब्बल १,५०० कोटींची मदत, टाटा सन्सने दिले आणखी १ हजार कोटी शिर्डीच्या साई मंदिर ट्रस्टकडून कोरोनाच्या लढाईसाठी ५० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे 'टाटा'कडून तब्बल १,५०० कोटींची मदत, टाटा सन्सने दिले आणखी १ हजार कोटी मुंबई - देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टकडून नेहमीच योगदान दिलं जाते. गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठं संकट म्हणून सध्या कोरोना आणि देशातील लॉकडाऊनकडे पाहिलं जातंय. या संकटासाठी अनेक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था पुढाकार घेत आहेत. आपल्यापरीने प्रत्येक संस्था, व्यक्ती कोरोनाच्या लढाईत मदत करत आहे. कुणी, व्यक्तिश:, कुणी लहान-सहान गरजूंना अन्न पुरवतही आपलं योगदान देत आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना मदतीचं आवाहन केलंय. मोदींच्या आवाहनला मोठा प्रतिसाद देशभरातून मिळत आहे. रतन टाटा यांनी ५०० कोटींची मदत टाटा ट्रस्टकडून जाहीर केली होती. त्यानंतर, टाटा सन्सकडून कोरोनाच्या लढाईसाठी आणखी १ हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.  शिर्डीच्या साई मंदिर ट्रस्टकडून कोरोनाच्या लढाईसाठी ५० कोटी रुपया...

कोरोना च्या गंभीर परिस्थितीत माय रिस्पॉन्सिबिलिटी ग्रुपचा मायेचा ओलावा*गोरगरिबांना जेमतेम १महिना पुरेल इतका किराणा सामान वाटप*

इमेज
कोरोना च्या गंभीर परिस्थितीत माय रिस्पॉन्सिबिलिटी ग्रुपचा मायेचा ओलावा *गोरगरिबांना जेमतेम १महिना पुरेल इतका किराणा सामान वाटप* बीड प्रतिनिधी जगभरात कोव्हिड १९  ने थैमान घातले आहे. या कोरोना व्हायरसमुळे माणसे घरातून बाहेर निघणे मुश्किल झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे, बीड च्या माय रिस्पॉन्सबिलीटी या सोशल मीडियावरील व्हाट्स अप ग्रुप गरिबांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे.  21 दिवसांच्या कर्फ्यू मुळे गोरगरिबांची वाताहत होत आहे ज्यांची हातावर पोट आहेत अशांना या कोरोना मुळे उदभवलेल्या परिस्थिती चा मोठा फटका बसला आहे येथील दिंद्रुड येथील  मोलमजुरी शिवाय पर्याय नाही पण गेल्या पंधरा दिवसांपासून घरातून बाहेर निघता न आल्यामुळे पोट भरणे अवघड झाले आहे अशांना बीड जिल्ह्यातील  सोशल मिडीयावर व्हाट्स अप ग्रुप माय रिस्पॉन्सिबिलिटी या सामाजिक बांधिलकी जपणार्या ग्रुपने सुभद्रा हरकळ,शांताबाई पास्टे, मथुरा बाई हवाले,जया स्वामी,मनोज वकरे, अनिता कांबळे यांना पुढील एक महिना पुरेल इतका किराणा भरत माणुसकी जपली आहे.समाजात काहीतरी चांगले करावे या हेतूने  अनेक सामाजिक का...

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या व्यथा पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे मांडल्या

इमेज
राज्यातील ऊसतोड कामगारांच्या व्यथा पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे मांडल्या ऊसतोड मजूरांच्या हाल अपेष्टा थांबवा, त्यांना सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली मागणी मुंबई प्रतिनिधी सध्याच्या गंभीर परिस्थितीत राज्यातील ऊसतोड कामगारांचे होत असलेले हाल पाहून पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या व्यथा सरकारसमोर मांडल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवून त्यांनी ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या सर्व ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे आपापल्या घराकडे पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. ऊसतोड कामगार हा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात स्थलांतरित होणारा कामगार आहे. संचारबंदी आणि लाॅकडाऊनच्या काळात सरकारने सर्व नागरिकांना घरामध्ये थांबायला सांगितले आहे. ऊसतोड कामगार हा आपले घर सोडून समूहाने राहून ऊसतोडण्याचे व वाहतुकीचे काम करतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत मध्ये त्यांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे सहानुभूतीने त्यांचा विचार करून त्यांच्याबद्दल निर्णय केला पाहीजे. संचारबंदी आणि लाॅकडाऊन च्या काळात ऊसतोड कामगारांना सुद्धा सुरक्षित राहण्या...

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या व्यथा पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे मांडल्या

इमेज
राज्यातील ऊसतोड कामगारांच्या व्यथा पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे मांडल्या ऊसतोड मजूरांच्या हाल अपेष्टा थांबवा, त्यांना सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली मागणी मुंबई प्रतिनिधी सध्याच्या गंभीर परिस्थितीत राज्यातील ऊसतोड कामगारांचे होत असलेले हाल पाहून पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या व्यथा सरकारसमोर मांडल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवून त्यांनी ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या सर्व ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे आपापल्या घराकडे पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. ऊसतोड कामगार हा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात स्थलांतरित होणारा कामगार आहे. संचारबंदी आणि लाॅकडाऊनच्या काळात सरकारने सर्व नागरिकांना घरामध्ये थांबायला सांगितले आहे. ऊसतोड कामगार हा आपले घर सोडून समूहाने राहून ऊसतोडण्याचे व वाहतुकीचे काम करतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत मध्ये त्यांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे सहानुभूतीने त्यांचा विचार करून त्यांच्याबद्दल निर्णय केला पाहीजे. संचारबंदी आणि लाॅकडाऊन च्या काळात ऊसतोड कामगारांना सुद्धा सुरक्षित राहण्या...

सोशल मीडियावर अफवा; दोघांवर गुन्हा

इमेज
सोशल मीडियावर अफवा; दोघांवर गुन्हा  बीड: सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जाणिवपूर्वक द्वेषभाव व तेढ निर्माण करण्याच्या हेतून पोस्ट व्हायरल केली. या प्रकरणी पोस्ट व्हायरल करणार्‍या तरुणासह सदरील ग्रुप अ‍ॅडमीनवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर आव्हाड या तरुणाने कर्नाटक राज्यातील एक जातीय तेढ निर्माण करणारा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट केला. यामुळे पाटोदा पोलीस ठाण्यात सुधाकर आव्हाड व ग्रुप अ‍ॅडमीन राहुल शाहुराव जाधव यांच्यावर कलम 505 (2), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना संदर्भातील अफवा व कुठल्याही जातीय तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करु नये. आपल्यावर बीड पोलीसांच्या सायबर सेल विभागाची नजर आहे. अन्यथा कडक कारवाई करण्यात यईल असे बीड पोलीस दलाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

दोन टिप्परसह दारु विक्रेत्यांवर एलसीबीच्या पथकाची कारवाई

इमेज
दोन टिप्परसह दारु विक्रेत्यांवर एलसीबीच्या पथकाची कारवाई  बीड : जमावबंदी, संचारबंदी असतांना अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन हायवा टिप्पर व अवैध दारु विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शनिवारी (दि.28) केज तालुक्यातील विडा परिसरात केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भरत राऊत यांच्या आदेशाने केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैद्य धंदयावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.आनंद कागुणे यांच्यासह पोलीस कर्मचारी गंपू पवार, झुंबर गर्जे, गोविंद काळे, बालाजी दराडे हे हिवरा पहाडी मार्गे विडा परिसरात गेले. यावेळी विडा येथून दोन दुचाकीवरून सहाजण देशी दारू विक्री करण्यासाठी बीड येथे घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. कोरडेवाडी शिवारातील हनुमान वस्ती जवळील पुलाजवळ सापळा लाऊन दुचाकीवर पांढर्‍या पोत्यात देशी दारू घेऊन जात असलेल्या भीमा लक्ष्मण मस्के, अमोल लक्ष्मण मस्के, राजीव एकनाथ वाघमारे, जालिंदर राम हिरवे (रा.बीड) यांना ताब्यात घेतले. भैया उर्फ अशोक सुखदेव भाले व...

सोशल मीडियावर अफवा; दोघांवर गुन्हा

सोशल मीडियावर अफवा; दोघांवर गुन्हा  बीड: सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जाणिवपूर्वक द्वेषभाव व तेढ निर्माण करण्याच्या हेतून पोस्ट व्हायरल केली. या प्रकरणी पोस्ट व्हायरल करणार्‍या तरुणासह सदरील ग्रुप अ‍ॅडमीनवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर आव्हाड या तरुणाने कर्नाटक राज्यातील एक जातीय तेढ निर्माण करणारा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट केला. यामुळे पाटोदा पोलीस ठाण्यात सुधाकर आव्हाड व ग्रुप अ‍ॅडमीन राहुल शाहुराव जाधव यांच्यावर कलम 505 (2), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना संदर्भातील अफवा व कुठल्याही जातीय तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करु नये. आपल्यावर बीड पोलीसांच्या सायबर सेल विभागाची नजर आहे. अन्यथा कडक कारवाई करण्यात यईल असे बीड पोलीस दलाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याने पेट्रोलपंपला ठोकले सील

इमेज
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाचे  उल्लंघन केल्याने पेट्रोलपंपला ठोकले सील बीड : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड शहरातील एका पंपचालकावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.28) दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे पंपचालकांत खळबळ उडाली आहे. पंपचालकावर केलेली ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे.          फारोकी एजन्सीकडे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारतीय पेट्रोल पंप आहे. अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करणार्‍यांनाचा पेट्रोल देण्यात यावे. खाजगी नागरिकांना पेट्रोल देवू नये असे जिल्हाधिकारी यांचे आदेश होते. मात्र आदेश असतांनाही खाजगी नागरिकांना पेट्रोल देवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्यामुळे 188 नुसार बीड तहसिलदार किरण आंबेकर यांनी  सदरील पेट्रोल पंप सील केला. पेट्रोल पंपावर कारवाई करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या कारवाईमुळे पंपचालकांत खळबळ उडाली आहे. 

आता बँका सकाळीच उघडणार!

इमेज
आता बँका सकाळीच उघडणार! बीड: सुधारित आदेशानुसार जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आता सकाळी अडीच तासांचाच वेळ असणार आहे. याशिवाय बँका आणि पेट्रोल पंप देखील सकाळी लवकरच उघडण्यात येणार आहेत. आदेशात म्हटले की, जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंच्या सर्व आस्थापना वगळण्यात आल्या होत्या. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आचारसंहिता शिथील काळात सकाळ सकाळी 11 ते 3 या वेळेत खुली राहत होती. आता संचारबंदी शिथीलतेची वेळ बदलून सकाळी 7 ते 9.30 या वेळेत दुकाने खुली राहणार आहेत. तसेच, बँका आणि पेट्रोल पंपांसह प्रत्येक गोष्टीची वेळ ही सकाळी 7 ते 9.30 पर्यंतच असेल असे स्पष्ट शब्दात सांगत कोणताही गोंधळ होऊ नये, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले.

संचारबंदीच्या काळात काही किराणा दुकानदाराकडून ग्राहकाची लूट

इमेज
संचारबंदीच्या काळात काही किराणा दुकानदाराकडून ग्राहकाची लूट *नागरिकांतून संताप *जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावे-मागणी बीड | राज्यासह  देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाच्या पार्श्र्वभूमी देशात २१ दिवस संचारबंदीचा आदेश लागू केला. या संचार बंदीचा फायदा घेत जिल्ह्यातील काही किराणा दुकानदाराने किरणा सामानाचे भाव वाढवून  सर्वसामान्यांची लूट करण्यास सुरुवात केली. कोरोना सारख्या भयानक महामारीच्या काळात चढ्या भावाने किराणा सामानाची विक्री करणे म्हणजे मड्यावरच लोणी खाण्याचा प्रकार आहे. किराणा दुकानदारांच्या या भूमिकेमुळे नागरिकांतून संताप होत आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.    जगासह देशात आणि राज्यात कोरोना नावाच्या आजाराने मोठे थैमान घातले आहे. या आजारापासून संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारने राज्यासह, देशात 21 दिवस (आचार संहिता) लॉक डाऊन ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार राज्यामध्ये 15 एप्रिल पर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या  आचारसंहितेच्या काळामध्ये ज...

कोरोनाबाधीतांवर आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचारआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

इमेज
कोरोनाबाधीतांवर आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि. २८: राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असुन महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दि. १ एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे १००० रुग्णालयांचा समावेश होणार असल्याने त्यामध्ये कोरोनाबाधीत मोफत उपचार घेऊ शकतील. या महत्वपूर्ण निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे 2000 व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी दिली.  कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य शासन करीत उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. शुक्रवारी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यामहत्वपूर्ण निणर्याबाबत दोघांशी चर्चा केली. यासंदर्भात अधिक मा...

परळीत 'वन रूफ हॉस्पिटल' सुरू करणे विचाराधीन, धनंजय मुंडे यांनी घेतली डॉक्टर प्रतिनिधींची बैठक

इमेज
परळीत 'वन रूफ हॉस्पिटल' सुरू करणे विचाराधीन, धनंजय मुंडे यांनी घेतली डॉक्टर प्रतिनिधींची बैठक परळी (दि.२८) ---- : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परळी येथे वन रूफ हॉस्पिटल अर्थात सर्व वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी, ही संकल्पना राबवणे विचाराधीन असून, त्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी येथील डॉक्टर प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी सर्व परिस्थिती व सुविधांचा आढावा घेऊन 'वन रूफ हॉस्पिटल' सुरू करण्याच्या बाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे ना. मुंडे यांनी सांगितले. या बैठकीत लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर मंडळींना येत असलेल्या विविध समस्यांबद्दलही व्यापक चर्चा झाली. डॉक्टर्सना सेवेदरम्यान लागणारे पीईपी किटसह अन्य वैद्यकीय साहित्याबद्दल यावेळी डॉक्टर्सनी ना. मुंडे यांना सविस्तर माहिती दिली.  या बैठकीत परळी शहर व ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्या व उपाययोजनांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी ना. मुंडे यांच्यासह रा. कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, डॉ. सूर्यकांत मुंडे, डॉ. मधुसूदन काळे, डॉ. अजित केंद्रे, ...

परळीत 'वन रूफ हॉस्पिटल' सुरू करणे विचाराधीन, धनंजय मुंडे यांनी घेतली डॉक्टर प्रतिनिधींची बैठक

इमेज
* परळीत 'वन रूफ हॉस्पिटल' सुरू करणे विचाराधीन, धनंजय मुंडे यांनी घेतली डॉक्टर प्रतिनिधींची बैठक* परळी (दि.२८) ---- : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परळी येथे वन रूफ हॉस्पिटल अर्थात सर्व वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी, ही संकल्पना राबवणे विचाराधीन असून, त्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी येथील डॉक्टर प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी सर्व परिस्थिती व सुविधांचा आढावा घेऊन 'वन रूफ हॉस्पिटल' सुरू करण्याच्या बाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे ना. मुंडे यांनी सांगितले. या बैठकीत लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर मंडळींना येत असलेल्या विविध समस्यांबद्दलही व्यापक चर्चा झाली. डॉक्टर्सना सेवेदरम्यान लागणारे पीईपी किटसह अन्य वैद्यकीय साहित्याबद्दल यावेळी डॉक्टर्सनी ना. मुंडे यांना सविस्तर माहिती दिली.  या बैठकीत परळी शहर व ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्या व उपाययोजनांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी ना. मुंडे यांच्यासह रा. कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, डॉ. सूर्यकांत मुंडे, डॉ. मधुसूदन काळे, डॉ. अजित केंद्र...

सकाळी सात ते साडेनऊ दरम्यान संचारबंदी शिथिल !

सकाळी सात ते साडेनऊ दरम्यान संचारबंदी शिथिल ! बीड प्रतिनिधी : जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आता सकाळी अडीच तासांचाच वेळ असणार आहे. याबाबतचे सुधारित आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. आदेशात म्हटले की, जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंच्या सर्व आस्थापना वगळण्यात आल्या होत्या. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आचारसंहिता शिथील काळात सकाळ सकाळी 11 ते 3 या वेळेत खुली राहत होती. आता याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या सुधारित आदेशानुसार सकाळी 7 ते 9.30 या वेळेत दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे खरेदीसाठी आता सकाळी वेळ निश्चित करुन देण्यात आली असून जमावबंदीचे उल्लंघन झाल्यास कारवाई होईल असे सांगण्यात आले आहे.

बी.सी.ग्रुपच्या वतीने जिव्हाळा बेघर, निराधार केंद्राला किराणाची मदत

इमेज
बी.सी.ग्रुपच्या वतीने जिव्हाळा बेघर, निराधार केंद्राला किराणाची मदत  बीड/प्रतिनिधी:  शहरातील भाजी मंडई परिसरातील बीड नगर परिषद आणि रेणुका माऊली सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  सुरू असलेल्या जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्राला बी.सी ग्रुपच्या वतीने  किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. मागील काही वर्षापासून बेघर अनाथ लोकांसाठी बीड नगर परिषद आणि माऊली सेवाभावी  संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र ज्येष्ठ समाजसेवक राजू वंजारे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले. सध्या या अनाथालयात ६०ते ७० निराधार अनाथ महिला-पुरुष वास्तव्यास आहेत.     आज सर्व जगभरात "करोना"व्हायरस ने थैमान घातले आहे. कोरोन रोगाचा प्रतिबंध करण्याच्या पार्श्वभुमीवर राज्यासह देशात लॉक डाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लॉक डाऊन परिस्थिती या जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील लोकांच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच अचानक रोडच्या कडेला सापडलेले २०ते२५ बेघर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या  जिव...

डीवायएसपी भास्कर सावंत यांची जिव्हाळा अनाथांनालयास भेट

इमेज
डीवायएसपी भास्कर सावंत यांची जिव्हाळा अनाथांनालयास भेट बीड[प्रतिनिधी]:  शहरातील भाजी मंडई परिसरातील बीड नगर परिषद आणि रेणुका माऊली सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  सुरू असलेल्या जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्राला बीड जिल्हयाचे पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत आणि जेष्ट पत्रकार गंमत भंडारी यांनी भेट दिली.   मागील काही वर्षापासून बेघर अनाथ लोकांसाठी बीड नगर परिषद आणि माऊली सेवाभावी  संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र ज्येष्ठ समाजसेवक राजू वंजारे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले. सध्या या अनाथालयात ७० निराधार अनाथ महिला-पुरुष वास्तव्यास आहेत. यापैकी काही दिव्यांग ,मनोरुग्ण व कुटुबीयांनी नाकारलेले बेदखल केलेले असे  लोक आहेत. या अनाथालयाला शहरातील दानशूर लोक मदत करत आहेत. शिवाय शहरातील अनेक प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते कार्यकर्ते आणि समाजसेवकांनी भेटी दिल्या आहेत. नुकतीच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट देवून पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यानंतर काल डीवायएसपी  सावंत यांनी भेट दिली. या ठ...